Thursday, June 18, 2020

कविता

1)किसी को आसानी सें मत मिलना,
लोग बहोत सस्ता समझ लेते है!

2)ध्येयवेडी माणसं कुटुंबाच्या वाट्याला जास्त
येत नाहीत; ती समाजाच्या वाट्यालाच
जास्त येतात!!

#कटूसत्य

3)ये दुनिया है जनाब..
महफिल में बदनाम और
अकेले में सलाम करती है!

4)भावकीचे चार लोक एकाच दिशेने,एकाच विचाराने
तेव्हाच चालतात..जेव्हा पाचवा खांद्यावर असेल!!

#कटूसत्य
#भावकी_जिंदाबाद

5)लोक काय म्हणतील? याचा विचार नकोच नको..
लोक फक्त हसायला येतात;पोसायला नाही!!

#काय_म्हणता?

6)जगाच्या यात्रेत कर्तृत्वाचा बाजार मांडावाच लागतो;अस्तित्वाची किंमत तशी होतच नाही!!

7)आपल्या यशातले 'वाटेकरी'..अपयशावेळी किना-यावर थांबून 'सल्लागार' होत असतात! 😢

8)समुद्राला,वादळांना आव्हान देताना,
नावाड्यानेच मग घात केला खरा..

9)छातीची ढाल करून सांभाळले ज्यांना,
त्यांनीच खुपसला हा पाठीत आज सुरा!

10)त्यांनी त्यांचेच पाहिले,
आम्ही उगाच ओझे वाहिले! 🙏

11)एक फोटो तुझा ठेवलाय अलमारीत शाबूत,
तुझ्या सौंदर्याचे लागतील कधीतरी पुरावे!

12)कुणी काळजात निवा-याला, 
तर कुणी देव्हा-याला ठेवली..
आईच्या कुशीत असताना मी,
सुखे दारात पहा-याला ठेवली!

13)कुणाला सांगावे..कसे आयुष्य ढवळून गेले,
कवितेच्या नादात सारे गणगोत बदलून गेले!

घर एकत्र नांदताना लिहीले होते ज्या सुखांवर,
वाटणीवेळी त्यांना कुरवाळायचे विसरून गेले!

14)गांव सोडले पण 'गांवपण' बाकी आहे,
तिथे अजून माझे एक नांव पण बाकी आहे..

तिर्थयात्रेस आल्यावर कळले मला मग,
माय-बापातच खरे 'देवपण' बाकी आहे!



                                    

                                           

                                   

             

                    

                               

No comments:

Post a Comment