Sunday, September 27, 2020

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.* *श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

*मुखेड तालुक्यातील कबनुर गावचा समावेश जलजीवन मिशन योजनेत करावा.*

*श्रीकांत जाधव यांचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना साकडे.*

बाराहाली:-मुखेड तालुका हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो तालुक्यात वाड्या वस्त्या जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सतत तालुक्यातील लोकांना वणवण करावी लागते त्यामुळेच तालुक्यातील बाऱ्हाळी सर्कल मधील कबनुर या गावात देखील पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिने माय माऊलींना तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागते उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याबरोबरच सांडपाण्याच्या पाण्यासाठी देखील खूप वाईट परिस्थिती निर्माण होते टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो काही वेळेस ते पण मिळत नाही मागील उन्हाळ्यात श्रीकांत जाधव यांनी गावचे काही देणे लागतो या भावनेतून काही सामाजिक संस्थेकडून गावात पाणीपुरवठा सुरुवात केला होता पण हे प्रत्येक वर्षी करणं शक्य नाही त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कबनुर गावचे भूमिपुत्र व सतत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणारे श्रीकांत जाधव यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे यांना भेटून गावातील नागरिकांची होणाऱ्या गैरसोयीबद्दल माहिती देऊन जलजीवन मिशन योजनेत कबनुर गावचा समावेश करावा यासाठी साकडे घातले राज्यमंत्र्यांनी देखील श्रीकांत जाधव यांना आश्वस्त करून निवेदनाची प्रत संबंधित खात्याच्या स्वीय सहाय्यकाकडे दिले.
              या योजनेत कबनुर गावचा समावेश झाला तर प्रत्येक नागरिकांना घरपोच पाणी मिळेल त्यांची रोज होणारी पायपीट थांबेल व पाण्याचे देखील योग्य नियोजन होईल व गावात केंव्हाच पाणीटंचाईला सामोरे जावाव लागणार नाही असे श्रीकांत जाधव यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण पटवारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment