ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांसाठी पूर्ववत करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांची मागणी...
हिंगोली:-राज्यातील खाजगी व शासकीय माध्यमिक व प्राथमिक इ.५वी ८वी च्या शाळा २७ जानेवारी पासून सुरू होत आहेत मात्र कोरणा च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ठप्प असलेली एस.टी. बस वाहतूक विद्यार्थ्यांच्या साठी पूर्ववत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब व शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली त्यांनी या निवेदनात म्हटले आहे कोरोना लाॅकडाऊनच्या काळानंतर शाळांना शासकीय नियमाचे पालन करत शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली . आता दि. २७ जानेवारी पासून इ.५वी ८वी या ही शाळा सुरू होत.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरी भागाकडे शाळांसाठी ये-जा करत असतात मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या एस.टी बसेस सुविधा सुरू नाहीत त्यामुळे विद्यार्थी खाजगी वाहनाने ये-जा करत असतात त्यांचा आर्थिक भुर्दंड या विद्यार्थ्यांना सोसावे लागत आहे तरी शासनाने ही एस.टी बस सुविधा लवकरात लवकर सुरू करावी.
No comments:
Post a Comment