Thursday, January 21, 2021

*मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार -- रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे*

*मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार -- रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे*

मुंबई दि. 20: महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात वेगवेगळया कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते मात्र आज अनेक कामांसाठी मजूर मिळत नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना विभागाच्या माध्यमातून मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी पुढील काळात व्यापक स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

स्वयंसहाय्यता/बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार हमी योजनेमार्फत विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठक रोह्यो राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नरेगाचे आयुक्त शंतनू गोयल, रोह्यो विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह यशस्विीनी सामाजिक अभियानाच्या वर्षा निकम, रत्नमाला शिंदे, ज्योती पावरा, मनिषा केंद्रे, उज्ज्वला राऊत उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, आज अनेक ठिकाणी अकुशल मजूर मिळतात पण ते कामावर येण्यास तयार नसातात. येणाऱ्या काळात मजुरांनी जास्तीत जास्ज प्रमाणात सहभाग नोंदवावा यादृष्टीने काम करण्यात येणार आहे. मजूर उपस्थिती वाढविण्यासाठी ग्रामसभा आणि बचत गट यांचाही आधार घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्तरावरील सर्व लोक प्रतिनिधींना रोह्योबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रोह्यो मजूरांना मजुरी विहीत कालावधीत मिळेल याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.या योजनेबाबत दर 15 दिवसांनी आढावा घेण्यात यावा. रोह्यो कामाची रक्कम मजूरांना लगेच अदा करण्यात यावी. कामाच्या ठिकाणी मजूरांना मिळणाऱ्या सुविधा उदाहरणार्थ प्रथमोपचार पेटी, पिण्याचे पाणी, पाळणाघर या सुविधा मिळतील याबाबत दक्षता घेण्यात यावी असेही श्री. बनसोडे यांनी यावेळी नमूद केले.

*शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेतून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल*

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना यशस्वी करण्यासाठी बचत गटातील महिलांनी/प्रतिनिधींनी पुढाकार घेत ही योजना यशस्वी करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबविण्यात येत आहे. शेतीसोबत शेती पूरक व्यवसायाला चालना मिळावी, ग्रामीण आर्थिक चक्राला चालना मिळावी यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार आहे. मनरेगा योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत 4 वैयक्तिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन व शेड बांधणे, कुक्कुटपालन व शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग यांचा समावेश या योजनेत केला असून या योजनेत शेतकऱ्यांना भरीव अनुदान मिळणार आहे.महाराष्ट्रात अनेकवेळा पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भ या भागात सतत ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान होते, त्यावेळी ही योजना लाभदायक ठरणार आहे. शेतीपूरक व्यवासायातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल आणि शेतीसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत निर्माण होईल असेही श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment