Tuesday, May 18, 2021

*निडेबन येथील कबीर नगर वार्ड-क्र 3 मधील नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यात यावे. प्रहार चे तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांची मागणी*

*निडेबन येथील कबीर नगर वार्ड-क्र 3 मधील  नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यात यावे. प्रहार चे तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांची मागणी*
वार्ताहर:-निडेबन येथील वार्ड क्र- 3 मधील कबीर नगर या गल्लीमध्ये एक ही बोर नसल्यामुळे पाण्याचा त्रास होत आहे. कोरोना मुळे राज्यात लोकडाऊन सुरू आहे.या परिस्थितीत आधीच हवालदिल झालेले गोरगरिबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावात नियोजनाअभावी टंचाई निर्माण होणे हा दरवर्षीचाच नित्याचा विषय बनला आहे . मे महिन्यात उदभवणारी पाणी टंचाई ची समस्या ही विशेषतः महिलांकरिता अडचणींचा विषय आहे . अशा प्रसंगी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . सध्या तलावात मुबलक पाणीसाठा असूनही सोडले जात नाही अनेक वेळा ग्रामसेवक साहेब यांना सांगुन देखील सदर पाणी टंचाई दुर झालेली नाही. म्हणून आज   गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती उदगीर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे , तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका  कार्याध्यक्ष महादेव आपटे  निडेबन येथील रहिवाशी महिलांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले ..

Monday, May 17, 2021

कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी ग्रामसभा संपन्न.

कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी ग्रामसभा संपन्न.
वार्ताहर:-आज मुखेड तालुक्यातील कबनुर येथे विविध विकासकामांच्या नियोजनासाठी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत कबनुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच कमलाबाई वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत गावच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करता येईल यावर सर्व गावकऱ्यांच्या समक्ष चर्चा करण्यात आली यावेळी गावात पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होऊ नये या हेतूने तात्काळ पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक घरात नळजोडणी करण्याचा व गावात दुर्गंधी पसरू नये यासाठी नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
                  याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी एस.डी.गवई,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष देशमुख,माजी मुख्याध्यापक बालाजी वडजे,उपसरपंच प्रतिनिधी माधव टेम्बुरने,रामदास वाघमारे,पंढरी कांबळे,बालाजी देशमुख, संजय देशमुख, प्रेमदास राठोड,प्रयागबाई देशमुख,काशीराम राठोड आदी उपस्थित होते.

Sunday, May 16, 2021

*राजीवभाऊ च्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली-श्रीकांत जाधव कबनुरकर*

*राजीवभाऊ च्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली-श्रीकांत जाधव कबनुरकर*
वार्ताहर:-मराठवाड्याच्या या भूमीला नेतृत्वाची खान असच मनाव लागेल अगदी इतिहास काळापासून ते इंग्रजांशी आणि निजामांशी स्वतंत्र लढा असेल या भूमीने या देशाला अनमोल हिरे दिलेले आहेत. यात  शिवाजीराव देशमुख (तत्कालीन पार्लमेंट सेक्रेटरी पंतप्रधान इंदिरा गांधी), शंकरराव चव्हाण (केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, मुख्यमंत्री) विलासराव देशमुख (पुर्व मुख्यमंत्री) गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असे महान नेतृत्व लाभले आहे त्यांनी या राज्यासाठी, ज्यांनी या देशासाठी अगणित कामे करून ठेवली आहेत. याच नेतृत्वाचा वारसा मा.राजीवजी सातव याच्या रूपाने आपल्याला लाभल होता पंचायत समिती सदस्य, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, गुजरात काँग्रेसचे प्रभारी, आपल्या उल्लेखनीय कार्यातून सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणारे सुप्रिया सुळे नंतरचे दुसरे खासदार.आम्ही आपल्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची अनेक स्वप्ने पहिलीत भाऊ, आपल्याला या राज्याच नव्हे तर देशाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करायच होत. पण आपण आज आम्हाला पोरकं केलेत महाराष्ट्र राज्याची पर्यायाने देशाची ही हानी कधीही भरून निघणार नाही आपल्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे असे मत विद्यार्थी नेते तथा "मास" विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव कबनुरकर यांनी व्यक्त केले..

Tuesday, May 11, 2021

*लातूर जिल्ह्यातील गाव तेथे क्वारनटाईन सेंटर उभारणे व उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील आँक्सीजन व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करा**प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांची मागणी..*

*लातूर जिल्ह्यातील गाव तेथे क्वारनटाईन सेंटर उभारणे व उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील  आँक्सीजन व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करा*
*प्रहार उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे यांची मागणी..*
वार्ताहर:-कोरोना हया महामारीने संपूर्ण देशात थैमान घातला आहे व रोज लातूर जिल्ह्यातील  कोरोना चे पेंशट वाढत आहे व पेंशट ला वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकांना जिव गमवावा लागत आहे तरी मेंहरबान साहेबांनी जिल्हा परिषद शाळेचा ऊपयोग क्वारंटाईन सेंटर म्हणून केल्यास रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते व रूग्ण गावातच राहील्याने
    घरचा डबा .घरचीच  खाट असल्याने कमी खर्चात ज्यास्त पेशंट बरे होतील, अशी उपाय योजना करने काळाची गरज आहे .   
कोवीड पेशंटला  प्रथम अवस्थेत उपचार करणे  गरजेचे आहे . लक्षणॆ दिसताच चाचणी  करून औषध उपचार केल्यास  पेशंट प्रथम अवस्थेत लवकर बरा होवू शकतो .
हे आता सर्वानाच समजल आहे . गावतील प्रतिष्ठीत लोकानी ,संरपंच उपसंरपंच तरुणांनी मनावर घेतल्यास हे सहज शक्य आहे.
तर आणखीन पेशंटची देखभाल गावातील, अंगणवाडी सेविका* मदतनीस, आशा वर्क्स, नर्स(NM)  मलेरिया (MPW) ग्रामसेवक ,तलाटी,ग्रामपंचायत शिपाई, कोतवाल, ह्याना शासकीय आदेश दिले तर काम फार सोपे होईल
असे केल्याने ग्रामीण भागातील परीस्थिती लवकर सुधारणा होऊ, शकते.व शहरी भागातील रूग्णालयातील आरोग्य यंत्रना कमी पडत आहे.उदगीर उपजिल्हारूग्णालय येथील 300 आँक्सीजन बेड व 100 व्हेटीलेंटर बेड तात्काळ उपलब्ध करून सामान्य रुग्णांना होणारा त्रास कमी होईल तर आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे ता.अध्यक्ष रविकिरण बेंलकुदे उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे तालुका सचिव महादेव आपटे यांच्या वतीने मा उपजिल्हाधिकारीसाहेब उदगीर यांच्या मार्फत मा जिल्हा अधिकारी साहेब लातूर यांनी त्वरित संबंधीताना निर्देश देवुन उपाय योजना करावी असे निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे..