*निडेबन येथील कबीर नगर वार्ड-क्र 3 मधील नागरिकांची पाणी टंचाई दूर करण्यात यावे. प्रहार चे तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांची मागणी*
वार्ताहर:-निडेबन येथील वार्ड क्र- 3 मधील कबीर नगर या गल्लीमध्ये एक ही बोर नसल्यामुळे पाण्याचा त्रास होत आहे. कोरोना मुळे राज्यात लोकडाऊन सुरू आहे.या परिस्थितीत आधीच हवालदिल झालेले गोरगरिबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावात नियोजनाअभावी टंचाई निर्माण होणे हा दरवर्षीचाच नित्याचा विषय बनला आहे . मे महिन्यात उदभवणारी पाणी टंचाई ची समस्या ही विशेषतः महिलांकरिता अडचणींचा विषय आहे . अशा प्रसंगी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे . सध्या तलावात मुबलक पाणीसाठा असूनही सोडले जात नाही अनेक वेळा ग्रामसेवक साहेब यांना सांगुन देखील सदर पाणी टंचाई दुर झालेली नाही. म्हणून आज गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिती उदगीर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष - विनोद तेलंगे , तालुका अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे , तालुका उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे , तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे निडेबन येथील रहिवाशी महिलांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले ..
No comments:
Post a Comment